पंचायत समिती चिखलीसमोर मनसेचे घंटानाद आंदोलन ; भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी
चिखली /(छोटू कांबळे ) - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 606 सिंचन विहिरीतील भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज ९ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या घंटानाद आंदोलन करून परिसर हादरवून टाकला. पंचायत समिती चिखली येथे मनसे जिल्हाप्रमुख बंडू बरबडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जोरदार पद्धतीने सुरू आहे.
सन 2024-25 मध्ये चिखली पंचायत समिती अंतर्गत मंजूर 606 सिंचन विहिरींमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असून एका विहिरीसाठी 70 हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून घेतल्याचा आरोप आहे. हे पैसे काही रोजगार सेवक, ग्राम पंचायत सचिव आणि खाजगी दलालांमार्फत संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे . मनसेने यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन दिले होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
आंदोलनाचा गडगडाट
आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पंचायत समिती चिखली येथे जमून घंटानाद करत भ्रष्टाचाराचा निषेध सुरू केला आहे. या आंदोलनाला मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, चिखली तालुकाध्यक्ष विनोद खरापास, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण येवले, उप तालुका अध्यक्ष संदीप नरवाडे, उप तालुकाध्यक्ष अविनाश सुरडकर, चिखली शहर उपाध्यक्ष रवी वानखेडे, तालुका सचिव अजय खरपास, मनसे विद्यार्थी सेनेचे उप तालुकाध्यक्ष अंकित इंगळे, विद्यार्थी सेना चिखली शहर अध्यक्ष अंकित कापसे, दिनकर खरपास, पंढरी मैंद,मंगेश उगले, स्वप्निल थीगळे, मधुकर ठेंग,विठ्ठल इंगळे, अंकुश भरंडवाल, विजय शिरसाट, शुभम जाधव, शेषराव जाधव, सिद्धू अक्कर, दीपक बरबडे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्ये उपस्थित आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत त्वरित चौकशीची मागणी केली. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी याला पाठिंबा दर्शवला. मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
0 Comments