जवानांचा अथक प्रयत्न ; आग नियंत्रणात आणली परंतु नुकसान अपरिमित
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली एमआयडीसी परिसरातील चेतन नागवाणी यांचे नागवानी इंडस्ट्रीज या पत्रावळी व द्रोण तयार करणाऱ्या कंपनीला दिनांक 21 मार्चच्या मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.
आग लागल्यानंतर तातडीने चिखली आणि बुलढाणा नगरपरिषदच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रवीण जाधव, राहुल गवळी, पांडुरंग सोळंकी, तुषार गवई, शेख इस्माईल, अनुप खरे, सागर गवळी आणि अन्य जवानांनी अथक प्रयत्न केले. या जवानांच्या प्रचंड मेहनतीमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेत १२ ते १५ लाखोंचे साहित्य जळून खाक झाले असून, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून यासंदर्भात तपास सुरू आहे. ही घटना औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
0 Comments