Encroachment : मातंग स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवा आणि मातंग समाजाला न्याय द्या !

मातंग समाजाच्या हक्काच्या जमिनीवर शेती ; अतिक्रमण हटवून सभागृहासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी

डिपीआय नेते छोटू कांबळे यांचे तहसीलदार व मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 



चिखली /( द बातमीवाला) : चिखली भाग - १ मधील मातंग समाजाच्या हक्काच्या ३५ ते ४० गुंठे जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात आज दिनांक २६ मे रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते भाई छोटू कांबळे यांनी तहसीलदार आणि चिखली नगरपालिकेच्या मुख्यधिकारी यांना निवेदन आणि तक्रार अर्ज सादर केला.

 सर्व्हे क्रमांक ६२ एफ क्लासमध्ये मातंग हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या या जमिनीवर सर्व्हे क्रमांक ६८ च्या धारकाने अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर जागेवर शेती सुरू असल्याने मातंग समाजाच्या हक्कांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

सभागृहासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी

भाई छोटू कांबळे यांनी सादर केलेल्या निवेदनात, अतिक्रमण झालेल्या जमिनीची त्वरित मोजणी करून ती मातंग समाजाला परत देण्यात यावी, तसेच समाजाच्या कल्याणासाठी आणि उपयोगासाठी त्या जागेवर सामाजिक सभागृह उभारण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या ३० जुलै २०२५ रोजी पर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यास डिपीआय नेते छोटू कांबळे हे येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी  आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी प्रशासनाला या समस्येवर त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments