चिखली पोलीसांची कारवाई ; गहाळ मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
चिखली/(छोटू कांबळे) : चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळापासून मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वारंवार समोर येत होत्या. यावर कारवाई करत ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पथकाने 2.57 लाख रुपयांचे 21 मोबाईल हस्तगत करून मुळ मालकांना परत केले आहेत.
ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांनी पोलीस अंमलदार विजय किटे, सुनिल राजपूत आणि महिला पोलीस अंमलदार रुपाली उगले यांच्या पथकाला या प्रकरणात शोधकार्यासाठी सुचना दिल्या होत्या. पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे विविध ठिकाणांवर शोधमोहीम राबवली. यामध्ये Oppo, Vivo, Samsung, OnePlus, Redmi यांसारख्या विविध कंपन्यांचे मोबाईल सापडले.
हस्तगत केलेल्या मोबाईल्सची किंमत : सदर मोबाईल्सची एकूण किंमत 2,57,000/- रुपये इतकी असून, त्यामध्ये Oppo Reno 10 (25,000/-), Vivo A3 Pro (18,000/-), आणि OnePlus Ce2 (15,000/-) अशा उच्च दर्जाच्या फोनचा समावेश आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून पोलीस विभागाच्या या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन: सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बि. बि. महामुणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेमुळे चिखली पोलीसांचे काम कौतुकास्पद ठरले आहे.
नागरिकांचे समाधान: या प्रकरणामुळे चिखली पोलीस विभागावर नागरिकांचा विश्वास आणखी दृढ झाला असून अशा प्रकारच्या कार्यवाहीने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
0 Comments